कुणास ठावूक आज मन थांबले…
रस्ता माहित होता पण मुद्दामून वाट चुकले
जाता जाता सोबतीला फक्त एकांत…
सोबतीला तुझ्या आठवणी अन वाऱ्याचि लहर ती संथ
थोडासा मग विसावा घेतला एका समुद्रकिनारी…
तिथे काही स्मरणात आल्या तुझ्या जुन्या आठवणी
त्या आठवणींशी खेळता खेळता कळलेच नाही कधी संद्याकाळ झाली…
स्वतास सावरले मग थोडे आणि घराची वाट धरली…
पुन्हा आली ती रात्र पुन्हा तो एकांत…
विचार केला आता तुला नाही आठवायचे
पण हा विचार करताना सुद्धा हे मन तुझ्याच चेहऱ्यावर येउन थांबते…
तुझ्या या आठवणी मला कितवर रे छळ्नार
होशील न रे तू माझा कि हि फक्त एक आस असणार…???
फक्त तुझ्या आठवणीत….
कविता…(२२ डिसेंबर २०११)
No comments:
Post a Comment